मनातला "कचरा"


          दैनंदिन जीवनातल्या अनावश्यक गोष्टी आपण कचऱ्यात टाकून देतो तसंच मनात येणारे अनावश्यक विचार सुद्धा आपण कचऱ्यात टाकून द्यायला हवेत. पण टाकून दिलेला कचरा म्हणजे टाकाऊ वस्तू असो वा मनात येणारे निरूपयोगी विचार असो हे दुसऱ्याला त्रासदायक होतील अशा ठिकाणी आपण टाकायला नको. कारण आजकाल कुरकुरे, चिप्स यांची रिकामी पाकिटे, पाण्याची रिकामी बाटली यांचा कचरा रस्त्यावर खूप प्रमाणात पडलेला दिसतो. याच कचऱ्यामुळे पावसाळ्यात गटारी तुंबून गटारीतलं घाण पाणी बाहेर येऊन रस्त्यावर साठू लागतं आणि रोगराई पसरू लागते. स्वच्छता कामगार आपलं गाव स्वच्छ ठेवण्याचं त्यांचं काम अगदी व्यवस्थित करत असतात पण एक गावकरी म्हणून आपण असा कचरा कचरपेटीतच टाकून त्यांना छोटीशी मदत करू शकतो आणि पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य आजारांपासून खूप जणांची मुक्तता करू शकतो. चला तर मग हा भौतिक कचरा कचरपेटीच टाकू आणि मनातला "कचरा" योगधारणेद्वारे नष्ट करू म्हणजे कोणत्याच कचऱ्याचा कोणाला त्रास होणार नाही.

- डॉ. संदीप सोमेश्वर टोंगळे.

Comments

Popular Posts